खरीप हंगाम २०२४ साठी ओला दुष्काळ जाहीर करून उपाययोजनांसह कर्जमाफी:- मा.आ.साहेबराव पाटील यांची मांगणी..
अमळनेर|| दि.१५ऑक्टोबर २०२४ | (रिजवान मन्यार):- या संदर्भात मा.मुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्रात म्हंटले आहे की खरीप हंगाम – जून ते सप्टेंबर, २०२५ आणि १३ ऑक्टोबर, २०२४” अखेर अमळनेर तालुक्यात ९८४.२६ मि.ली. आणि पारोळा तालुक्यात ७५७.०० मि.ली. म्हणजेच सरासरीपेक्षा अधिक सततचा पाऊस, विजांचा कडकडाटसह वादळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कापसासह सर्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे खरीप हंगाम – २०२४० हातातून गेल्यामुळे शेतकरी पुन्हा हताश होवून दुहेरी संकटात सापडला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची शासनाप्रती असंतोषाची व नाराजीची भावना दूर करण्यासाठी “ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफीसह तातडीने आर्थिक मदत करण्याच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, पुनश्च या अपेक्षांसह, हिच आपणास योग्य वेळ आहे.